सुंदरकांड पाठ कसा करावा : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक संकटं, अडचणी, मानसिक आणि शारीरिक त्रास, कौटुंबिक कलह, शत्रू त्रास, तांत्रिक अडचणी यांचा आपण सामना करत असतो.
अनेक वेळा डॉक्टर, औषधं, उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. अशा वेळी मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात.
या लेखात आपण “सुंदरकांड सेवा” या अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केल्यास निश्चित फलदायी ठरणाऱ्या आध्यात्मिक उपायाविषयी माहिती घेणार आहोत.
या सेवेच्या माध्यमातून केवळ आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात असे नाही, तर मन:शांती, आत्मबल आणि प्रभू श्रीराम व हनुमानजींचा विशेष कृपाशीर्वाद सुद्धा लाभतो.
ही सेवा कोण करू शकतो, कशी करावी, कोणत्या वेळेस करावी, महिलांनी मासिक पाळीच्या वेळी काय करावं, कोणते नियम पाळावेत, काय नैवेद्य द्यावा, वाचन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात – या सर्व गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन या लेखामध्ये दिलेले आहे.

सुंदरकांड सेवा कोणत्या कारणांसाठी केली जाते?
सुंदरकांड सेवा ही एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केलेली सेवा आहे जी जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती देणारी ठरते.
हनुमानजींवरील भक्ती, रामनामाचा प्रभाव, आणि सुंदरकांडातील दिव्य ऊर्जा यामुळे मन, घर, आरोग्य आणि नात्यांमधील समस्या दूर होण्यास मदत होते. ही सेवा कोणत्या कारणांसाठी केली जाते, ते पाहूया.
१. संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी:
जीवनामध्ये अचानक येणाऱ्या अडचणी, मानसिक अशांती, नकारात्मक घटना किंवा सतत अपयश यापासून सुटका होण्यासाठी सुंदरकांड सेवा अत्यंत उपयुक्त आहे. ही सेवा केल्याने संकटाचे मूळ कारण उलगडते आणि संकट दूर होण्यास सुरुवात होते.
२. शत्रू त्रास कमी होण्यासाठी:
कधी कधी आपल्यावर कोणीतरी जाणीवपूर्वक त्रास देत असतो. अशा शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी, आणि कोणालाही वाईट न वाटू देता त्या व्यक्तीपासून आपोआप सुटका व्हावी यासाठीही सुंदरकांड सेवा केली जाते. हनुमानजींच्या कृपेने शत्रू स्वतःहून दूर जातो.
३. घरातील आजार, सतत डॉक्टरकडे जाणं थांबवण्यासाठी:
सतत आजारी पडणं, दवाखान्याचे चकरा, औषधांनीही फरक न पडणं या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी सुंदरकांड अत्यंत उपयुक्त आहे. या सेवेमुळे शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
४. तंत्र-मंत्र, बाहेरील बाधा, दृष्ट यांपासून संरक्षणासाठी:
कधी कधी एखादी अज्ञात शक्ती किंवा वाईट नजर यामुळे घरात भांडणं, अस्वस्थता, आर्थिक नुकसान होतं. सुंदरकांड सेवा केल्याने या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात शांती येते.
५. व्यसनांपासून मुक्तीसाठी:
घरातील मुलं, पती किंवा इतर सदस्य व्यसनाच्या आहारी गेले असतील, तर त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे. सुंदरकांडात असलेल्या उर्जा आणि मंत्रांमुळे व्यक्तीचा मनोबल वाढतो.
६. नातेसंबंधांतील वाद मिटवण्यासाठी:
सुना-सासू, नवरा-बायको, आई-वडील-मुलं यांच्यातील भांडणं, गैरसमज, तणाव हे सौम्य करण्यासाठी आणि प्रेमपूर्वक नातेसंबंध टिकवण्यासाठी सुंदरकांड सेवा केली जाते.
७. इच्छा पूर्ण होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी:
आपण केलेली सेवा जर संकल्पपूर्वक आणि श्रद्धेने केली, तर ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच इच्छित कार्य सिद्ध होते, अनुभव येतात. त्यामुळे ही सेवा कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.
८. घरामध्ये सकारात्मकता आणि शांती निर्माण करण्यासाठी:
दररोज सुंदरकांडचा पाठ, पाण्याचा शुद्ध स्पर्श, गोड नैवेद्य, आणि हनुमानजींची सेवा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वातावरण शुद्ध होते आणि घरातील सर्वजण शांत, समाधानी राहतात.
सुंदरकांड पाठ कसा करावा? (सुंदरकांड वाचनाची संपूर्ण माहिती)
सुंदरकांड हा रामचरितमानस ग्रंथातील एक महत्त्वपूर्ण कांड आहे. श्रीहनुमानाची महिमा, भक्ती, आणि त्यांच्या पराक्रमाचे वर्णन या कांडामध्ये अत्यंत प्रभावीपणे आले आहे.
सुंदरकांड वाचन केल्याने संकटे टळतात, शत्रू आपोआप दूर जातात, आजारातून आराम मिळतो, तांत्रिक बाधा दूर होते आणि घरात शांतता नांदते.
जर तुम्हाला कोणतेही संकट असेल, मानसिक त्रास, भांडण, व्यसन, रोग, तांत्रिक त्रास किंवा घरात नकारात्मक ऊर्जा असेल, तर सुंदरकांड पाठ हा एक रामबाण उपाय आहे.
सुंदरकांड पाठ करण्यासाठी आवश्यक तयारी:
- संकल्प ठरवा:
- 11, 21, 40 किंवा 108 दिवसांचा संकल्प ठरवा.
- किंवा दर मंगळवार / शनिवार हे दिवस निवडा.
- महिलांनी मासिक पाळीच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी मंगळवार/शनिवारपासून सुरू करावी.
- 11, 21, 40 किंवा 108 दिवसांचा संकल्प ठरवा.
- योग्य वेळ:
- सकाळी ब्रह्म मुहूर्त (सर्वोत्तम).
- सकाळी अंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी.
- काम करणारे व्यक्ती आपल्याला योग्य वाटेल त्या वेळेला करू शकतात.
- सकाळी ब्रह्म मुहूर्त (सर्वोत्तम).
- स्थळ निवड:
- देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावे.
- समोर श्रीराम किंवा हनुमानजींचा फोटो असावा.
- दिवा, अगरबत्ती, गंध, हार इत्यादी अर्पण करावे.
- देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावे.
हेही वाचा : कुंकुमार्चन म्हणजे काय ? कुंकुमार्चन कसे-कधी करावे?
सुंदरकांड पाठ करण्याची पद्धत :
१. पूजेसाठी साहित्य:
- हनुमानजींचा फोटो/मूर्ती
- दिवा (तेलाचा किंवा तुपाचा)
- अगरबत्ती
- गंध, फुले
- गुळ-फुटाण्याचा नैवेद्य / बुंदी लाडू / फळ
- एक ग्लास पाणी
२. मंत्र जप:
- सुरुवातीला एक माळ (१०८ वेळा) “श्रीराम जय राम जय जय राम” मंत्राचा जप करावा.
- हा मंत्र हनुमानजींना अर्पण करायचा कारण त्यांना रामनाम अत्यंत प्रिय आहे.
३. ग्रंथपूजन:
- सुंदरकांड ग्रंथाला नमस्कार करावा.
- मनात आपली इच्छा बोलून प्रार्थना करावी.
४. वाचनाची सुरुवात:
- किशकिंधा कांडचे पहिले दोन पान वाचा (सुंदरकांडपूर्वी).
- त्यानंतर सुंदरकांड वाचन सुरू करा.
५. वाचन करताना:
- प्रत्येक दोहा/चौपाईनंतर “सियावर रामचंद्र की जय” किंवा “श्रीराम जय राम जय जय राम” म्हणावे.
- वाचन शांत, समजेल अशा आवाजात करावे.
- पाठीसमोर ठेवलेले पाणी पूर्ण पठण होताना ऊर्जा शोषते.
६. वाचन पूर्ण झाल्यानंतर:
- हनुमानजींना नैवेद्य दाखवा.
- मंत्रमाळ पुन्हा एकदा करा (श्रीराम जय राम जय जय राम).
- नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो किंवा दुसऱ्या दिवशीही ग्रहण करता येतो.
- वाचनाचे पाणी घरातल्या सर्वांनी प्यावे व घरात शिंपडावे.
- आजारी व्यक्तींना ते पाणी पाजावे व अंगावर शिंपडावे.

विशेष सूचना:
1. वाचनाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे.
2. मासिक पाळी/सुतक असल्यास सेवा थांबवून नंतर पुढे सुरू करा.
3. संकल्पाचे नियम पाळा: वेळ शक्यतो कायम एकच ठेवा.
4. गावाला गेल्यास, खरोखर गरज असेल तरच सेवा घेऊन जा.
5. वाचन अर्धवट ठेवू नका, अखेरपर्यंत पूर्ण करा.
सेवा पूर्ण झाल्यावर:
- शेवटच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन दिवा, नारळ, फळ अर्पण करा.
- घरात नैवेद्य (वरण-भात, भाजी, पोळी, गोड) करून श्रीराम व हनुमानजींना अर्पण करा.
- अन्नदान करायचे असल्यास तोही उत्तम पर्याय आहे.

सेवा अर्धवट राहिल्यास – परत सुरुवातीपासून करावी की पुढे सुरू ठेवावी?
आपण एखाद्या अध्यात्मिक सेवेला संकल्पपूर्वक सुरुवात केली की, आपोआपच आपल्यात एक निग्रह, श्रद्धा आणि शिस्त येते. पण कधी कधी काही कारणामुळे ही सेवा अर्धवट थांबते.
मासिक पाळी, सुतक, प्रवास, आजार किंवा घरात आलेली अचानक अडचण. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, “आता ही सेवा परत सुरुवातीपासून करावी का?”
या प्रश्नाचं उत्तर एका रेषेत देणं कठीण असलं, तरी तुमच्या मन:स्थितीवर, श्रद्धेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. खाली दिलेले दोन मार्ग आपल्याला समजून घेण्यासाठी उपयोगी पडतील:
१. श्रद्धेने सुरूवातीपासून करणे (परत संकल्प घेणे):
जर तुम्हाला वाटत असेल की, सेवा अर्धवट राहिल्याने तिचा पवित्रपणा खंडित झाला आहे, किंवा तुमचं मन पूर्ण समर्पणात राहणार नाही, तर परत सुरुवातीपासून सेवा करणे हे अधिक योग्य ठरेल.
काही जण सुतक किंवा अशुद्धीमुळे संपूर्ण सेवा नवा संकल्प घेऊन सुरू करतात आणि त्यामध्येही त्यांना उत्तम अनुभव येतो.
२. जिथे सेवा थांबली होती तिथूनच सुरू ठेवणे:
कधी कधी आपली सेवा ३०-३५ दिवसांपर्यंत झालेली असते आणि शेवटचे काही दिवस बाकी असताना सेवा थांबते.
अशा वेळी तुमचं मन जर तुम्हाला सांगत असेल की मी सेवा अर्धवट सोडू नये, आणि तुमचं श्रद्धा व विश्वास अजिबात ढळलेला नसेल, तर तुम्ही जिथे सेवा थांबली होती तिथूनच ती सुरू ठेवू शकता.
अशा प्रकारात तुमची सेवा पुन्हा एकदा त्याच भक्तिभावाने पूर्ण करणे हे अधिक महत्त्वाचे असते. येथे ‘काय नियम आहे?’ यापेक्षा ‘तुमचे मन काय सांगते?’ हे जास्त महत्त्वाचं ठरतं.
थोडक्यात:
- जर मन अस्वस्थ असेल, समाधान नसेल, तर सुरुवातीपासून सेवा सुरू करावी.
- जर मनाने पूर्ण विश्वास असेल, तर पुन्हा जिथे थांबली होती तिथून सेवा पुढे सुरू ठेवावी.
शेवटी काय महत्त्वाचं आहे?
सेवेची शुद्धता, तुमचा भक्तिभाव आणि श्रद्धा. सेवा म्हणजे देवाशी जोडलेला एक पवित्र संवाद आहे. देव कृपा करतात ती मनापासून केलेल्या सेवेवर, नियमांच्या जोखडावर नव्हे. म्हणून मनाला जे योग्य वाटेल ते करा – पण भक्तीला, प्रेमाला आणि सातत्याला कधीही कमी पडू देऊ नका.
निष्कर्ष:
सुंदरकांड पठण ही केवळ एक धार्मिक सेवा नसून, ती श्रद्धा, भक्ती आणि आत्मिक शांतीचा मार्ग आहे. संकटे कितीही मोठी असोत, शत्रूचा त्रास असो, घरातील वादविवाद, आजारपण, किंवा बाह्य बाधा या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणून सुंदरकांडचे पठण अनुभवास येते.
ही सेवा करताना मनात निष्ठा, श्रद्धा आणि दृढ विश्वास असणे आवश्यक आहे.
वरील दिलेली माहिती तुमहाला महत्वाची आणि योग्य वाटली असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहा ,अशा प्रकारच्या इतर माहिती पूर्ण लेख साठी आमच्या वेबसाईट वर अजून लेख वाचू शकता.